#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत.
कोरोनाने भारतात देखील बारा हजाराच्या वर हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
राज्यातील उद्योग सुरु करण्याबाबत उद्योग विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे किंवा अजिबात नाही अशा ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग सुरु करण्याबाबत राज्य सरकारने कृती गट स्थापन केला होता. या कृती गटाचा अहवाल आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सादर केला जाणार आहे. या कृती गटात उद्योग सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, एमआयडीसीचे सीईओ, उद्योग विभागाचे विकास आयुक्त यांचा समावेश आहे.
देशात गेल्या 24 तासांत 37 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 414 वर पोहोचली आहे. भारतातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 12,380वर पोहोचला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात चार वर्षीय चिमुरडी, तिची आई, अन्य एक महिला आणि पुरुष अशा चौघांचा समावेश आहे. हे सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे शहराचा आकडा हा 48 वर जाऊन पोहचला आहे, त्यापैकी 12 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एकाचा मुत्यू झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये क्वारंटाईन सेंटरमधून 30 मजूर आणि विद्यार्थी पळाले. बुधवारी सकाळी उघड झाला होता प्रकार. पातूरातील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात क्वॉरंटाईन करून ठेवलं होतं. सर्व विद्यार्थी आणि मजूर तेलंगाणातील असून 30 मार्चपासून पातूरात थांबलेले होते. प्रशासनाकडून फरार लोकांचा शोध सुरू आहे.
यवतमाळमध्ये काल प्रतिबंधित क्षेत्रातील एका नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पवार पुरा भागातून रात्री 130 लोकांना सात रुग्णवाहिकेतून तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर या सगळ्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील 14 कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किटशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 18 कर्मचाऱ्यांना अॅडमिट केलं. या 18 ही कर्मचाऱ्यांचं स्वॅब रात्री उशिरा घेतले आणि त्यांना वेगळ्या विभागात ठेवण्यात आलं.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सांगली पोलिसांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना आणि मास्क न घालणाऱ्यांना शिक्षेचा पॅटर्न बदलला आहे. उठाबशांऐवजी आता कोलांटउडीची शिक्षा देण्यास सुरुवात केली आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याकडून आरग गावातील विनाकारण बाहेर पडणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्यांना ही शिक्षा दिली.
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात काल कोरोनाच्या 232 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2916 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 2 जण मुंबईत, 6 पुण्यात तर तर अकोला मनपा येथील एक रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 187 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या हजार नमुन्यांपैकी 48 हजार 198 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 2916 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 69 हजार 738 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 5617 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 259 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 6 पुरूष तर 3 महिला आहेत. त्यातील 4 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 3 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 9 रुग्णांपैकी 6 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 2684
मृत्यू - 187
मुंबई महानगरपालिका- 1896 (मृत्यू 114)
ठाणे- 12
ठाणे महानगरपालिका- 97 (मृत्यू 3)
नवी मुंबई मनपा- 68 (मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली- 50 (मृत्यू 2)
उल्हासनगर- 1
भिवंडी, निजामपूर - 1
मिरा-भाईंदर- 51 (मृत्यू 2)
पालघर- 5 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 32 (मृत्यू 3)
रायगड- 5
पनवेल- 10 (मृत्यू 1)
नाशिक - 2
नाशिक मनपा- 2
मालेगाव मनपा - 48 (मृत्यू 2)
अहमदनगर- 10 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 17
धुळे -2 (मृत्यू 1)
जळगाव- 1
जळगाव मनपा- 1 (मृत्यू 1)
पुणे- 10
पुणे मनपा- 362 (मृत्यू 40)
पिंपरी-चिंचवड मनपा- 35 (मृत्यू 1)
सातारा- 6 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा- 1 (मृत्यू 1)
कोल्हापूर- 1
कोल्हापूर मनपा- 5
सांगली- 26
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा- 23 (मृत्यू 2)
जालना- 1
हिंगोली- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-4
बीड - 1
अकोला मनपा - 13 (मृत्यू 1)
अमरावती मनपा- 6 (मृत्यू 1)
यवतमाळ- 5
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर- 5
नागपूर मनपा - 50 (मृत्यू 1)
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 5394 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 20 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या हजार नमुन्यांपैकी 48 हजार 198 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 2916 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 69 हजार 738 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 5617 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 259 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 6 पुरूष तर 3 महिला आहेत. त्यातील 4 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 3 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 9 रुग्णांपैकी 6 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 2684
मृत्यू - 187
मुंबई महानगरपालिका- 1896 (मृत्यू 114)
ठाणे- 12
ठाणे महानगरपालिका- 97 (मृत्यू 3)
नवी मुंबई मनपा- 68 (मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली- 50 (मृत्यू 2)
उल्हासनगर- 1
भिवंडी, निजामपूर - 1
मिरा-भाईंदर- 51 (मृत्यू 2)
पालघर- 5 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 32 (मृत्यू 3)
रायगड- 5
पनवेल- 10 (मृत्यू 1)
नाशिक - 2
नाशिक मनपा- 2
मालेगाव मनपा - 48 (मृत्यू 2)
अहमदनगर- 10 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 17
धुळे -2 (मृत्यू 1)
जळगाव- 1
जळगाव मनपा- 1 (मृत्यू 1)
पुणे- 10
पुणे मनपा- 362 (मृत्यू 40)
पिंपरी-चिंचवड मनपा- 35 (मृत्यू 1)
सातारा- 6 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा- 1 (मृत्यू 1)
कोल्हापूर- 1
कोल्हापूर मनपा- 5
सांगली- 26
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा- 23 (मृत्यू 2)
जालना- 1
हिंगोली- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-4
बीड - 1
अकोला मनपा - 13 (मृत्यू 1)
अमरावती मनपा- 6 (मृत्यू 1)
यवतमाळ- 5
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर- 5
नागपूर मनपा - 50 (मृत्यू 1)
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 5394 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 20 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
0 comments:
Post a Comment
please do not enter any spam link in comment box.